आरसपानी

📖 About Araspani आरसपानी — मनाच्या ओलाव्यातून उमटलेले शब्द. (Araspani – Words born from the quiet drizzle of thought.) लेखक: डॉ. राजेश कापसे ✨ अनुभव, विचार आणि जीवनातील छोट्या क्षणांची गोष्ट. 🌐 www.rajeshkapsebooks.com 📸 Instagram: @rajubhai_bams

About Araspani / आरसपानी विषयी

📖 About Araspani आरसपानी — मनाच्या ओलाव्यातून उमटलेले शब्द. (Araspani – Words born from the quiet drizzle of thought.) लेखक: डॉ. राजेश कापसे ✨ अनुभव, विचार आणि जीवनातील छोट्या क्षणांची गोष्ट. 🌐 www.rajeshkapsebooks.com 📸 Instagram: @rajubhai_bams

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

टकलावर केस उगवतानाः माझी “कृषी” कथा

वयाच्या चाळीशीत टक्कल पडायला सुरुवात झाली. सुरुवातीला वाटलं — “अरे दोन केस गेले तर काय होतं?”

पण ४५ व्या वर्षी परिस्थिती अशी झाली की डोक्यावरचा “प्लॉट” पूर्ण रिकामा झाला.

आरशात बघताना वाटायचं — “हा मी की माझ्या आजोबांचा फोटो?”


हॉस्पिटलमध्ये माझा डॉक्टर मित्र Hair Transplant करून आला. ६–७ महिन्यांत तर त्याचे केस असे भरले की पाहून मला वाटलं — अरे बाप रे, हा तर परत २५ चा झालाय!

तेव्हा मीही मनाशी ठरवलं, “बस्स! आता माझ्या टकलावरही शेती करायचीच.”


पण मुद्दे कठीण:

खर्च — भारी!

संपूर्ण टक्कल करणे — दु:खद!

दाढीचे केस उपटणे — भीषण!

लोकल अ‍ॅनेस्थेशिया — सुयांचा पाऊस!


मित्र म्हणाला “कर रे! काही होत नाही!”

बायको म्हणाली “करायलाच पाहिजे! मला माझा नवरा पुन्हा तरुण दिसायला हवा!”

(आणि इथेच माझा निर्णय पक्का झाला.)


Transplant center मध्ये गेल्यावर माझी तपासणी झाली. मग माझे केस टक्कल करून मार्किंग सुरू झाले.

लोकल अ‍ॅनेस्थेशिया देताना इतक्या सुया टोचल्या की मला वाटलं — “हे भयंकर आहे. शक्य होईल का मला?”


दाढीचे केस काढताना काय वेदना! आणि मग तेच केस सुयांनी टोचून माझ्या टकलावर रोपण!

मी मनात म्हणत होतो — “डोक्यावर शेती करण्यापेक्षा ऊसाची शेती केली असती तर बरे झाले असते. किमान गोड तरी लागले असते!”

दुसऱ्या दिवशी उठलो तर चेहरा पूर्ण सुजलेला!

क्षणभर वाटलं — “हे काय… केस वाढवायला आलो होतो आणि सुजलेला भयंकर चेहरा घेऊन घरी आलो?”


डॉक्टर शांत स्वरात म्हणाले : “दोन दिवसात उतरते.”

मी घाबरलेला: “माझं आयुष्य उतरतंय की सुज उतरतेय?”


आठवड्यानंतर खपल्या काढल्या. मग सुरू झाली प्रतिक्षा…

दररोज आरशात बघणे सुरू झाले — जणू काही IPL auction मधला खेळाडू जसा आपला नंबर कधी लागतोय म्हणून वाट पाहतो, तसा मी केस कधी उगवतील म्हणून वाट बघत होतो.


५–६ महिन्यांनी शेवटी पहिला केस उगवला!

तो एक केस पाहून मी इतका आनंदी झालो जसा शेतकऱ्याला पहिला मोसमी पाऊस आला की होतो.


मग गोळ्या, लोशन, खास शॅम्पू, बिसलेरीचे पाणी — माझा टक्कल राजा आता VIP treatment घेत होता.


हळूहळू “शेती” भरभरून यायला लागली.

आणि आज…

पाहता पाहता टक्कल केसांनी भरून गेले..आणि माझा आत्मविश्वास परत आला आणि मीही किमान 10 वर्षांनी तरी कमी वयाचा दिसायला लागलो!

-राजेश कापसे


“A collection of moments that make life meaningful — from quiet mornings to long drives, from music to family, from sunsets to simple joys.”


15 Things I Love Most About Life


Life is not always about milestones — sometimes, it’s the smaller, quieter moments that shape us the most. As I move through each day, I find myself collecting experiences that make me pause, smile, feel grateful, and reconnect with who I truly am.

Here are the 15 things that fill my life with joy, purpose, and peace.


1. The Magic of 5 AM

There’s something sacred about waking up before sunrise. A warm mug of black coffee in hand, and a peaceful Headspace meditation — this gentle silence prepares me for everything that’s ahead.

2. Morning Rides With My Younger Son


Dropping my younger son to school is pure happiness.

The bike ride, the conversations, the excited goodbye at the gate — these moments are golden. Through him, I relive the beauty of my own childhood.

3. The 7:30 AM Window Seat Ritual

Every morning, I catch the 7:30 local train and secure my favourite window seat.

With my flute class recordings or a thoughtful podcast playing, this becomes my personal moving meditation.

4. Playing the Flute for My 86-Year-Old Mother

Visiting my mother and playing the flute for her is one of the purest joys of my day.

Her smile, her silence, her blessings — these moments nourish my soul.

5. Prayers and Warm Greetings

A prayer to Lord Ganesh, followed by cheerful good mornings with my hospital colleagues — a beautiful blend of spirituality and human warmth.

6. Joy in the Community Ward

Meeting patients after their cataract surgeries and seeing the happiness in their eyes reminds me why my profession is a blessing.

Healing is a privilege.


7. Lunch Made With Love

Lunch prepared by Sawant Kaka — dedicated, hardworking, and full of heart even at 65 — is not just food, but affection served on a plate.


8. Evenings at the Gym

My workout at Studio Gym with my coach Gautam is where I push limits, recharge, and rebuild — physically and mentally.

9. Writing My New Book

Working on Rajubhai BAMS fills me with incredible enthusiasm.

Every chapter reminds me of my journey, my values, and the stories that shaped me.

10. Flute Lessons With My Guru

Learning from Pandit Ronu Majumdar Ji and Pdt Eknath Thakur ji is transformative.

Sometimes, I slip into a state of samadhi — a beautiful mindlessness where only the music exists.


11. The Arabian Sea at Sunset

On the train ride back to Mumbai, I often watch the sun sink into the Arabian Sea.

A moment of calm in the chaos — a reminder that endings can be beautiful too.

12. Walks With My Wife

Evening walks with my wife at Dadar Chowpatty garden, with the sound of waves accompanying us, are moments that feel grounding and gentle.

13. Cycling With My Son

Cycling along the Worli sea face with my son — laughter, wind, speed, and bonding — simple joys that become lifelong memories.

14. Long Drives to Malvan

Driving through the Konkan, especially towards Malvan, fills me with nostalgia and peace.

The roads, the forests, the coastline — it is nature’s therapy.


15. A Drive to Nariman Point With My Elder Son

Recently, an evening drive to Nariman Point with my elder son became a moment I’ll always remember.

Listening to him talk about media concepts, his new podcasts, and his growing passion — with the Arabian Sea beside us — took me back to my college days.

I remembered the dreams I once had before life carried me into a different stream.

Some moments make you pause, smile, and rediscover the person you used to be.


Life is not about chasing the extraordinary; it’s about embracing the everyday miracles.


These 15 moments — from early morning rituals to trains, journeys, prayers, music, family, and silent sunsets — remind me that joy is always around us.

All we need is the heart to notice it.

Rajubhai B.A.M.S.

9819915070

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

🧠 डोपामिन फास्टिंग : मेंदूला विश्रांती देण्याची एक नवी संकल्पना


✍️

मागच्या काही वर्षांत मोबाईल आपला अविभाज्य साथीदार बनला आहे. फोनची रिंग वाजल्यावर उचलणे स्वाभाविक आहे; पण रिंग न वाजली तरी सतत मोबाईल हातात घेणे — ही आता एक नवीनसवय नव्हेव्यसनच झाली आहे.

क्षणोक्षणी नोटिफिकेशन, लाईक्स, कमेंट्स तपासण्याची अधीरता — जणू काही आपला मेंदू त्यावर जगू लागला आहे. इन्स्टाग्रामवर आलेला लाईक, फेसबुकवरील कमेंट, किंवा व्हॉट्सअॅपचा ब्लू टिक — हे सगळं क्षणिक आनंद देतं, पण आतून रिकामेपणही वाढवतं.

एका क्षणी मला जाणवलं — “ही एक नवीन प्रकारची तलप आहे.”

म्हणून मी फेसबुक अॅप हटवलं. पण लगेच लक्षात आलं — इन्स्टाग्रामवरून थेट फेसबुकला जाता येतं! अशा रीतीने आपण एका डिजिटल जाळ्यात अडकत चाललो आहोत.

ही सर्व “तलप” म्हणजे मेंदूमधील डोपामिन नावाच्या रसायनाचा परिणाम आहे.

डोपामिन हे मेंदूमधील “आनंद” आणि “प्रेरणा” देणारं रसायन आहे. आपण काही आनंददायक गोष्ट करतो — जसं की सोशल मीडियावर पोस्ट टाकणं, स्वादिष्ट अन्न खाणं, किंवा एखादा गेम जिंकणं — तेव्हा मेंदू डोपामिन सोडतो.

परंतु सतत या उत्तेजनांचा ओव्हरलोड झाल्यास मेंदू थकतो, आणि साध्या गोष्टींत आनंद मिळत नाही.

या चक्रातून बाहेर पडण्यासाठी “डोपामिन फास्टिंग” ही संकल्पना वाचनात आली.

हे म्हणजे डोपामिन बंद करणं नव्हे, तर ते अतिरिक्त प्रमाणात वाढवणाऱ्या कृतींपासून जाणीवपूर्वकदूर राहणं.म्हणजे असं,

🧘

• मोबाईल, सोशल मीडिया आणि टीव्हीपासून काही वेळ दूर राहा

• सततच्या गप्पा, संगीत, मनोरंजन टाळा

• फास्टफूड किंवा अनावश्यक खरेदी टाळा

मी स्वतः हा प्रयोग केला.

रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत मी माझा iPhone बंद ठेवायला सुरुवात केली. एक साधा नोकियाफोन घेतला — फक्त कॉलसाठी.

आश्चर्य म्हणजे, दोन तास माझे खरंच माझे झाले. मी पुन्हा पुस्तके वाचायला, बासरीचा रियाज करायला, जीमला जायला लागलो. घरच्यांसोबत वेळ घालवायला वेळ मिळू लागला. आणि मन शांत, प्रसन्न झालं.

🌼 डोपामिन फास्टिंगचे फायदे

• लक्ष केंद्रीत होते व एकाग्रता वाढते

• मन शांत होते, अस्वस्थता कमी होते

• झोप सुधारते

• आत्मनियंत्रण व संयम वाढतो

• साध्या गोष्टींमध्ये पुन्हा आनंद मिळू लागतो

तुम्हाला डोपामिन उपवास करायचा असेल तर खालील डायट प्लॅन नक्की करून बघा,

📅 एक दिवसाचा डोपामिन फास्टिंग प्लॅन

🌅 सकाळ (६.००–८.००)

• मोबाईलवर नजर न टाकता दिवसाची सुरुवात करा

• ध्यान, प्राणायाम किंवा चालणे

• शांतता किंवा हलके संगीत

☀️ पूर्वान्ह (८.००–१२.००)

• आवश्यक कामांवर लक्ष केंद्रित करा

• ईमेल/फोन फक्त ठराविक वेळेतच तपासा

• गप्पा/सोशल मीडिया टाळा

🍵 दुपार (१२.००–२.००)

• जेवताना टी.व्ही./मोबाईल नको

• हळूहळू, मनपूर्वक जेवण

• पचनानंतर थोडा वेळ शांत विश्रांती

🌇 सायंकाळ (५.००–८.००)

• फिरायला जा, पुस्तक वाचा किंवा छंद जोपासा

• स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा

🌙 रात्री (८.००–१०.००)

• मोबाईल एअरप्लेन मोडवर ठेवा

• हलकी प्रार्थना, लेखन किंवा आत्मचिंतन

• झोपण्यापूर्वी ३० मिनिटे पूर्ण शांतता

हे करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्या म्हणजे,

• हे डिटॉक्स नव्हे, तर माइंडफुल ब्रेक आहे

• सुरुवातीला २–३ तासांपासून सुरुवात करावी 

• हळूहळू आठवड्यातून १ दिवस पूर्ण फास्टिंग करा

• याचा उद्देश “टाळणे” नव्हे, तर “जाणीवपूर्वक वापरणे” हा आहे.

डोपामिन फास्टिंग म्हणजे आयुष्यापासून पळ काढणे नव्हे —

तर आयुष्य पुन्हा शांततेत अनुभवण्याचा एक प्रयत्न आहे.

सततच्या बाह्य उत्तेजनांपेक्षा अंतर्गत शांती आणि स्वतःशी संवाद साधण्यासाठी हा सोपा, पण प्रभावी मार्ग

“आनंद बाहेर शोधू नका — तो शांत मनातच सापडतो.” 🌿

✍️ डॉ. राजेश कापसे

deepakniramay@gmail.com

9819915070

गुरुवार, ९ ऑक्टोबर, २०२५

कल्याण ते दादर: असेही एक सिमोल्लंघन!

आम्ही आज शिवाजी पार्क दादर येथे स्वत:चे घर घेतले. मागे वळून बघताना बरेच काही आठवते.

२००७ मध्ये मला मुंबईत नोकरी मिळाली. मग घर कुठे करायचे याच्यावर बरीच चर्चा झाली. दादर,घाटकोपर,मुलूंड,ठाणे,डोंबिवली उतरत्या क्रमाने सगळीच ठिकाणं महाग न परवडणारी म्हणून कल्याण त्यातल्या त्यात बरे म्हणून नक्की केले. पुढची पाच वर्षे कल्याणहून दादर १ तास व तिथून मालाड ४५ मि. व तसाच परतीचा प्रवास दररोज किमान चार तास लागणार.अनेकवेळा वाटले की दादरला शिफ्ट व्हावं.पण मनाची तयारी व्हायची नाही. महाग असेल,परवडणार नाही शाळांचा खर्च परवडेल का? असे प्रश्न.कल्याणहून एकवेळ अमेरिकेत शिफ्ट होणे सोपे असेल पण माझ्या मराठी मनाची दादरला जाण्याची हिम्मत होत नसे.

माझे त्यावेळचे बाॅस आणि त्याहीपेक्षा मित्र श्रीनिवास सावंत हे २०१० ते २०१२ सातत्याने मला कल्याणहून दादरला शिफ्ट होण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. मला असं वाटत की त्यांनी उपनगरात राहणाऱ्या मराठी माणसांनी दादरमध्ये रहायला यावे यासाठी सतत प्रयत्न करण्याचा पण केला आहे. शेवटी २०१२ मध्ये मी दादरला राहण्यास यायचे ठरवले. दोन वर्ष लागली मनाची तयारी करायला!

माझ्यासोबत काम करणारी पूजा म्हणाली, "अरे किंग जाॅर्ज शाळेत तुझ्या मुलाच्या प्रवेशासाठी अर्ज तर कर. मिळेल ॲडमिशन". मी अर्ज केला आणि साधारणत: एक महिन्याने मला शाळेतून फोन आला. प्रवेशासाठी तुमच्या मुलास कागदपत्रांसह घेवून या!" अजून दादरमध्ये घर घ्यायचे होते. पण अर्णवला शाळेत घेऊन गेलो. शाळेत त्याला प्रवेश मिळाला पण दादरमध्ये घर असेल तरच असे सांगण्यात आले. तो थोडाच कल्याण ते दादर प्रवास करणार होता!

मग घराची शोधाशोध सुरू झाली. डाॅ. अनंत पंढरे सरांना फोन केला. मी त्यांना संकटमोचक म्हणतो. आजपर्यंतच्या माझ्या यशाचे ते शिल्पकार आहेत. त्यांनी परांजपे काकांचा फोन दिला आणि मग श्री. प्रमोद जोशींची ओळख झाली. त्यांना परदेशात मुलाकडे रहायला जायचे होते व त्यांचे दादरचे घर भाड्याने द्यायचे होते. त्यांनी मला ओळखत असलेल्या दोन व्यक्तींचा फोन द्यायला सांगितला. मी म्हणालो विद्यार्थी परिषदचं मी काम केलं आहे. त्यांनी विनयजी सहस्त्रबुद्धे यांना फोन केला. मग म्हणाले 'विनयजींनी सांगितलं आहे नि:शंकपणे राजेशला घर द्या. तो परिषदेचा कार्यकर्ता आहे." घराची व्यवस्था झाली. प्रमोदकाकांनी मला मागचे पाच वर्षे त्यांच्या मुलासारखे प्रेम केलंय. मग केले नक्की आणि दादरला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.

माझी पत्नी प्रज्ञाने मला पुर्ण साथ दिली आणि आम्ही कल्याणहून दादरला आलो. डाॅ. नियती चितालीया मॅडमनी आम्हाला दादरमध्ये स्थिरावण्यासाठी मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय इथे स्थिरावणे शक्यच नव्हते.

या प्रवासात मदत केलेल्या सर्वांचे आभार, या सर्वांच्या आशीर्वादामुळेच हे सिमोल्लंघन शक्य झाले.

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

शेवटचे दिवस


शेवटचे दिवस नेहमीच अवघड ठरतात.

जन्म देऊन, काळजाचा ठाव काढून वाढवलेली लेकरं,

आनंदाने ओतप्रोत खर्चून केलेली लग्नं,

घरातली गजबज, हशा, आरास…

पण आयुष्याच्या संध्याकाळी

ते सारेच कसे दुरावून जातात!

घरात उरतो केवळ एक शांतपणा—

भिंतींवर घुमणाऱ्या आठवणींचा,

आणि सोबतीला असते एक अनोळखी कामवाली.

तिलाही जगण्यासाठी पर्याय नसतो,

म्हणून तीच ठरते खरी सोबतीण

त्या अखेरच्या क्षणांची.

शेवटचे दिवस सरले की मात्र,

पुन्हा उमटतात ओळखीचे चेहरे.

आठवणींनी भारलेली लेकरं,

दुःखाच्या सावल्या पुसायला धावणारे नातेवाईक,

आणि मग घरभर पसरेल

गोडजेवणाचा सुगंध—

जणू मृत्यूही झाला असेल

फक्त एक सोहळा.

-राजेश कापसे 

शनिवार, ७ जून, २०२५

माप!

आज सकाळी काही जुने भांड्यांचे डबे उघडले आणि त्यात हे “माप” सापडले. गंगाखेडच्या कितीतरी आठवणी जाग्या झाल्या. दरवर्षी ज्वारी, गहू दुष्काळात मिलो मोजून घेताना आई हे माप वापरायची. आठ मापं म्हणजे पाच किलो! गेले ते दिवस.काळागणीक अनेक गोष्टी बदलतात. हे मापही बदलले आहे.

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

मंगळवार, २७ मे, २०२५

संन्यस्त साधू आणि त्यांचे आई बाबा !

साधारणतः एक वर्षापूर्वी माझी ओळख एका संन्यासी स्वामींबरोबर झाली. माझ्या एका डॉक्टर मित्राने मला फोन केला आणि सांगितले,”अरे माझा M.B.B.S चा एक मित्र स्वामी योगी अनंत (नाव बदलले आहे) तुझ्या हॉस्पिटलजवळच एका आश्रमात राहतो आणि तिथे त्याला मोफत नेत्र शिबीर घ्यायचे आहे. अनेक मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांना त्याचा फायदा होईल. त्यांना भेट नक्की.” मला जरा आश्चर्यच वाटले. कारण M.B.B.S चा क्लासमेट, संन्यासी हे जरा माझ्यासाठी अजबच होते. मी लगेच गाडी काढली आणि त्यांच्या आश्रमाकडे निघालो. त्या आश्रमामध्ये स्वामींची ओळख झाली. त्यांनी माझे खूप प्रेमाने आणि विनम्रपणे स्वागत केले, “नमो नारायण डॉ राजेश! तुमचे स्वागत आहे.” त्यांनी त्या आश्रमात एक आरोग्य केंद्र सुरु केले होते आणि जवळपासच्या ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांमध्ये ते आरोग्य सेवा देण्याचे काम करत होते. 

   “M.B.B.S झाल्यानंतर का संन्यास घेतला असेल?” हा प्रश्न माझ्या मनात आहे हे त्यांनी माझ्या चेहऱ्यावरील हावभावांवरून ओळखले. अनेक जण M.B.B.S करून पुढे M.D, D.M असे बरेच शिक्षण घेऊन श्रीमंत होण्याची स्वप्न बघतात. अकरावी, बारावीमध्ये तर दिवस रात्र एक करून अभ्यास करून सर्वोत्तम मार्क मिळाले तरच M.B.B.S साठी प्रवेश मिळतो. काही पालक तर करोडो रुपये देऊन या अभ्यासक्रमाला आपल्या मुलांना प्रवेश मिळवून देतात. M.B.B.S साठी काहीपण अशी मानसिकता असणारे अनेक पालक आणि विदयार्थी मी बघितले आहेत. किंबहुना मी सुद्धा त्यापैकीच एक होतो आणि या माणसाने नामवंत अशा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून M.B.B.S चे शिक्षण अत्यंत चांगल्या मार्काने पूर्ण करून चक्क संन्यास घेतला! स्वामीजी मला म्हणाले, “राजेश, हे बघ ही ईश्वरी इच्छा होती. तुम्ही लोक संसार करून समाजासाठी मोठे योगदान देता. मी संन्यस्त राहून वैद्यकीय सेवा देतो. प्रत्येकाचा मार्ग आणि त्यातून मिळणार आनंद वेगळा.” मी त्यांना भेटून भारावून गेलो. मग आम्ही त्यांच्या आश्रमात मोफत नेत्र शिबिरे घ्यायला सुरुवात केली. अनेक रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आमच्या आय हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्या. स्वामीजी स्वतः त्या रुग्णांसोबत हॉस्पिटलमध्ये येत असत. आमची खूप चांगली ओळख झाली. 

   एक दिवस मला स्वामीजींचा फोन आला. म्हणाले, “राजेश, तुझ्या हॉस्पिटलमध्ये श्री व सौ राणे (नाव बदलले आहे) येतील. ते साधारणतः ८५ आणि ८० वर्षांचे आहेत आणि त्यांना डोळ्यांची तपासणी करायची आहे. त्यांची योग्य ती काळजी घे. ते डायबेटिक आहेत. त्यामुळे जरा वेळेत उपचार होतील असे बघ.” मी त्या दोघांना हॉस्पिटलच्या स्वागत कक्षात भेटलो आणि त्यांची तपासणी व उपचार लवकर होतील याची व्यवस्था केली. त्या काकांना बघितल्यानंतर मला स्वामीजी आणि त्यांच्यामध्ये खूप साम्य जाणवले. मी विचार करत होतो, “हे स्वामीजींचे आई वडील तर नसतील?” त्याची तपासणी झाल्यानंतर त्यांना सोडण्यासाठी मी त्यांच्या कारपर्यंत गेलो. माझ्या मनात जे चालले होते, ते न राहवून मी व्यक्त केले, “काका, स्वामीजी तुमच्यासारखे दिसतात.” ते म्हणाले, “हो, ते माझे चिरंजीव होते. ते आता संन्यासी आहेत.” हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. दुसरे कुणी असते तर दु:खी कष्टी दिसले असते पण मुलाने M.B.B.S झाल्यानंतर घेतलेला संन्यास त्यांनी सहजपणे आनंदाने स्वीकारला होता. आपल्या अपेक्षांचे ओझे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मुलांवर ठेवणारे पालक आणि एकुलत्या एक मुलाने M.B.B.S झाल्यानंतर घेतलेला संन्यास सहज स्वीकारणारे हे पालक बघून आश्चर्य आणि आदर या संमिश्र भावनांनी मी त्यांना निरोप दिला.

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

शुक्रवार, २३ मे, २०२५

चढा आणि उतरलेला तबला

परवा बासरीचा क्लास संपल्यानंतर गुरूजी तबला उतरवून ठेवत होते. मी सहज विचारले, “सर, उद्या परत लागणार आहे तबला. उतरवून का ठेवताय?” म्हणाले, “अरे उन्हाळ्यात त्याचा स्वर खूप चढतो. म्हणून उतरवावा लागतो. नाहीतर उद्या नीट स्वर लागणार नाही. हिवाळ्यात याच्या उलट असते. तो खूप उतरतो. मग त्याचा स्वर चढवून ठेवावा लागतो.” मी विचार केला, "आपल्या मनाच्या अवस्थाही तबल्यासारख्याच असतात नाही का ? कधी सूर चढलेला तर कधी खूप उतरलेला ! ते स्वीकारून योग्य सूर लागण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. उतरलेल्या सूराला जरा वर चढवावे लागते तर चढलेले सूर उतरवावे लागतात तरच षड्ज चांगला लागतो !"

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com

शनिवार, ५ एप्रिल, २०२५

परिसस्पर्श!

काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपलं आयुष्यच बदलून जातं. २००५ मध्ये मी संभाजीनगरच्या (औरंगाबाद) सार्वजनिक वाचनालयात काही पुस्तकं शोधत होतो आणि पुर्णिया हाती लागलं आणि दिवसभरात ते मी वाचून संपवलं. मला त्यातली सहज सरळ लिखाणाची शैली इतकी आवडली की त्यानंतर महिन्याभरात डॅा. अनिल अवचटांची त्या वाचनालयातील सगळी पुस्तकं वाचून काढली. आणि पुण्यात जावून त्यांना एकदा भेटायचं ठरवलं.

एवढा मोठा माणूस मला भेटेल का? किती वेळ देईल? जरा मनात भीती होतीच. त्यांचा फोन नंबर  शोधायला सुरुवात केली.माझ्या विद्यार्थी परिषदेतील मित्र रत्नाकर पाटील यांनी त्यांचा नंबर मला दिला. फोन केला तो त्यांनीच उचलला.काय बोलावे सुचेना, मी म्हणालो तुम्हाला भेटायचे आहे. त्यांनी सांगितलं, “अरे मी आज जरा व्यस्त आहे, तू उद्या सकाळी ये ८ वाजता.” घराचा पत्ता दिला. माझं जवळचं कुणीतरी माझ्याशी बोलत आहे असं वाटलं. काही माणसांशी आपण क्षणात जोडले जातो.

भेटल्यानंतर ते म्हणाले, “ मला तू  ए बाबा म्हण!” मला संकोचाने एवढ्या मोठ्या व्यक्तीला अरेतुरे कसे म्हणायचे ते कळेना.त्यांनी दहा वेळा तसं म्हणवून घेतलं आणि मी त्यांचा जवळचा मुलगा झालो कायमचा! माझे वडील मी लहान असतांनाच वारले. अनेक वर्षांनी बाबा मिळाला. मग आम्ही खूप गप्पा मारल्या.त्यांनी बासरी वाजवली. मी ही बासरी शिकायचो. मी भुप वाजवायचा प्रयत्न केला. न कंटाळता त्यांनी तो ऐकला आणि म्हणाला, ‘एक सुर वाजवल्यानंतर त्यातूनच सहज दुसरा सुर लागला पाहिजे,अगदी अलगद.बघ प्रयत्न कर !’ मी त्या भेटीत खुप काही शिकलो.त्यांना संभाजीनगरला (औरंगाबादला) आलात की नक्की या म्हणालो. त्यांनी ओरिगामीने तयार केलेला मोर मला दिला. ते संभाजीनगरला (औरंगाबादला) एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर अनेकजण त्यांच्या बरोबर होते. मी त्यांना 'बाबा मी राजेश 'असं म्हणालो. त्यांनी जवळ घेतलं. हा माझा मुलगा राजेश !अशी ओळख करून दिली.’ ते रूग्णालय बघायला आले. सगळ्यांशी गप्पा झाल्या.माझ्या घरीही आले. एवढा मोठा माणूस पण कुठलाही अहंभाव नाही.

हेडगेवार रूग्णालयाच्या वतीने मी त्सुनामी मदत कार्यासाठी अंदमानला जातोय असे त्यांना सांगितले. लगेच त्यांनी मला त्याच्या ओळखीच्या आय.पी.एस. अधिकाऱ्याचा नंबर दिला.मी तिथे येतोय, त्याला काही मदत लागली तर नक्की करा असेही सांगितले. मी अंदमानला गेल्यानंतर त्या पोलिस अधिक्षक मॅडम मला घ्यायला आल्या!

काही वर्षांनंतर मी माझी नोकरी सोडायचा निर्णय घेतला आणि मुंबईत जायचे ठरवले. मला मुंबईत काम काही जमत नव्हते. मी खूप निराश झालो. डिपरेशनमध्ये गेलो. बाबाला फोन केला. त्याने मला पुण्याला बोलावले.मला त्याच्या गाडीत स्वत: ड्राईव्ह करत एका जवळच्याच डोंगरावर घेऊन गेला. भरपूर गप्पा मारल्या. डॉ.आनंद नाडकर्णींचा मला नंबर दिला. त्यांना फोन करून माझी काळजी घ्यायला सांगितले. म्हणाला, “ डॅा. आनंदला भेट, आनंदी होशील.” मी बरा झालो.मग प्रमोशन झालं. परदेशात गेलो. माझ्या करिअरमध्ये खुप प्रगती केली.

एकदा माझ्या जवळच्याच मित्राने मला फसविले. मी खूप अस्वस्थ होतो. बाबाला फोन केला. त्याने एक सुंदर दोहा सांगितला, “जावे सो मेरा नहीं मेरा सो जावे नही”.

मागच्या १७ वर्षांत अनेकवेळा अनेक चढउतारांमध्ये बाबाकडे गेलो. त्याला भेटलं की एक नवीन उत्साह, नवीन एनर्जी मिळायची.

कांही वर्षां पूर्वी मी बाबाला फोन केला होता. त्याचा आवाज खूपच थकलेला जाणवला. मी म्हणालो, “बाबा, मी राग भैरव शिकलो आहे, वाजवू का?” ‘जागो मोहन प्यारे 'ही बंदिश मी वाजवली. तो म्हणाला, “वा ! वा! छान वाजवलीस. मला नक्की पाठव.”

     दोन दिवसांनी कळले की, बाबा गेला.काही माणसं ही परिसासारखी असतात. त्यांच्या स्पर्शाने सोनं होतं. माझ्यासारख्या असंख्य मुलांची आयुष्य बाबानी घडवली. Baba We miss you!

-राजेश कापसे, 9819915070

deepakniramay@gmail.com