परवा बासरीचा क्लास संपल्यानंतर गुरूजी तबला उतरवून ठेवत होते. मी सहज विचारले, “सर, उद्या परत लागणार आहे तबला. उतरवून का ठेवताय?” म्हणाले, “अरे उन्हाळ्यात त्याचा स्वर खूप चढतो. म्हणून उतरवावा लागतो. नाहीतर उद्या नीट स्वर लागणार नाही. हिवाळ्यात याच्या उलट असते. तो खूप उतरतो. मग त्याचा स्वर चढवून ठेवावा लागतो.” मी विचार केला, "आपल्या मनाच्या अवस्थाही तबल्यासारख्याच असतात नाही का ? कधी सूर चढलेला तर कधी खूप उतरलेला ! ते स्वीकारून योग्य सूर लागण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात. उतरलेल्या सूराला जरा वर चढवावे लागते तर चढलेले सूर उतरवावे लागतात तरच षड्ज चांगला लागतो !"
-राजेश कापसे, 9819915070
deepakniramay@gmail.com
No comments:
Post a Comment