काल आई सोबत गप्पा मारताना मोबाईल रिचार्जचा विषय निघाला. तिने नवरात्रात घडलेला एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली,'२० रूपयांच्या रिचार्जलासुद्धा मोठी किंमत आहे रे!" मला काही कळले नाही. मी तिला म्हणालो, 'अगं पाच मिनिटात संपतो २० रू. रिचार्ज. काहीच होत नाही त्यात!
आई म्हणाली,"तुम्हां तरूण पिढीला नाही कळायचं ते!" नवरात्रीत एक आजी जोगवा मागत होत्या. मी १० रूपये टाकले आणि तुझ्या मावशीने १० ...झाले २० रूपये.
त्या आजी नंतर मला बाजूला घेवून गेल्या आणि खुप रडल्या. त्या म्हणाल्या, मोबाईल आहे पण मागचे दोन महिने रिचार्ज करायला पैसेच नाहीत. मुलाला विनंती केली पण तो सुद्धा नाही करत रिचार्ज. माझ्या भावाचा दोन महिने होऊन गेले पण अजुन फोन नाही आला. त्यालाही नाही पेन्शन बिन्शन..या उतार वयात नसतील पैसे त्याच्या- कडेही......माझी अवस्थाही तशीच.......मला सांगा २० रुपयांचे रिचार्ज होईल का हो?आज जोगव्यात मिळालेले २० रूपये वापरून करता येईल का मोबाईल रिचार्ज? जर तो करता आला तर मी करेन आणि बोलीन भावाला." आई त्यांना जवळच्या दुकानात घेवून गेली आणि फोन रिचार्ज करून दिला.२० रू. चा रिचार्ज! फोन रिचार्ज केल्यानंतर त्या भावाशी बोलल्या. त्यांना खुप बरं वाटलं.
२० रुपयाच्या मोबाइल रिचार्जबद्दल आईने जे सांगितले त्यामुळे मी खुप अस्वस्थ झालो. उतारवयात नसणारे पैसे, केलं जाणारं दुर्लक्ष, मनाला बोचरी वेदना देवून गेलं.
काही वर्षांपूर्वी जसोटा कुटीर, दादर पश्चिम येथील मध्यमवर्गीय सोसायटीमधील रहिवाश्यांनी ठरवले की सोसायटीची जमीन सोसायटीच्या मालकीची व्हावी. बिल्डरने जे करायचे तेच केले. सोसायटी रजिस्टर करून दिली आणि जागा सोसायटीच्या नावावर करून देतो असे आश्वासन दिले आणि पुढे काहीच केले नाही. नंतर अनेक वर्ष तशीच गेली. मग सोसायटीच्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये डीम्ड कॉन्व्हेयन्स करण्याचे ठरले आणि विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली. त्यामध्ये डीम्ड कॉन्व्हेयन्स का महत्वाचे आहे याबद्दल सर्व सभासदांना माहिती देण्यात आली आणि सर्वांनी बहुमताने तो ठराव मान्य केला.
कोबे, जपान येथील एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये माझ्या रिसर्च पेपरची निवड झाली आणि मला त्याठिकाणी जाण्याची संधी मिळाली. त्यासाठी मला पैशांची जमवाजमव करायची होती. हेडगेवार रुग्णालयातील डॉ अनंत पंढरे सरांनी माझ्यासाठी अनेकांशी बोलणे केले आणि मला स्कॉलरशिप मिळवून दिली. मी सगळा हिशोब केला आणि लक्षात आले की मला अजून दहा हजार रुपयांची गरज आहे. माझ्याकडे तेव्हढे पैसे असणे कठीण होते.
माझा मित्र, श्रीपाद कुलकर्णी नाशिकला स्वतःची लेबल प्रिंटिंगची मोठी कंपनी चालवतो. एकदा त्याच्या सोबत त्याच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये गेलो असता एक वेगळेच मॅनॅजमेन्ट तत्व शिकलो. त्याच्याकडे त्याच्या कामाची एक डायरी होती आणि त्यात तो सर्व कामे पेन ने लिहीत होता. साधारणतः महिन्यात करावयाच्या कामांची विस्तृत यादी त्या डायरीत त्याने लिहिली होती. ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळ्यात प्रथम तो डायरी उघडून त्यातील दिवसभरात करण्याची कामे एका लहान कागदावर लिहीत होता. मी त्याला कुतूहलाने विचारले तर तो म्हणाला, 'मी इलेक्ट्रॉनिक गॅजेट वापरात नाही. मी पेन, डायरी आणि या छोट्या फ्लॅश कार्डचा वापर करतो." मला आश्चर्य वाटले कारण एव्हडी मोठी कंपनी चालवताना सध्या बाजारात उपलब्ध असलेले हायटेक मोबाईल फोन आणि त्यातील ॲप वापरण्यापेक्षा तो चक्क डायरी, पेन आणि लहान कागद वापरात होता. स्वाभाविकपणे तो असे का करतो हा माझा पुढचा प्रश्न होता.
विचार शून्य अवस्था आणि आनंद याबद्दल विचार करताना अनेक लहान सहान घटना आठवल्या. दिवसभर न आवडणारे काम आणि त्याहूनही नआवडणारा प्रवास केल्यानंतर जर जेवणात मनापासून आवडणारा पदार्थ असेल तर मी भान हरपून जेवण करतो आणि लगेच थकवा जाऊन फ्रेश वाटायला लागतं.